राष्ट्रवादी पक्ष बळकट करण्यासाठी नागरिकांचे प्रश्न सोडवा – पक्ष निरिक्षक जीशान

दिपक हिवाळे / परतूर न्युज नेटवर्क
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी सामान्य नागरिकांच्या प्रश्न सोडवण्यावर भर द्या असे उदगार परतूर येथे आयोजित राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या आढावा बैठकीत परतूर विधानसभा पक्ष निरीक्षक झिशान यांनी काढले. या वेळी व्यासपीठावर प्रदेश सरचिटणीस पंकज बोराडे,युवकाचे जिल्हाध्यक्ष कपिल आकात,तालुका अध्यक्ष रमेश सोळंके,विजय राखे,अखिल काजी,भागवत कडपे आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना खान म्हणाले की पक्ष स्थापने पासून ते आज पर्यंत पक्षातील नेते कार्यकर्ते हे सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत प्रयत्न करत आला आहे. याची पावती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत मिळाल्या शिवाय राहणार नाही असे सांगत निवडणुकीच्या तयारीला लागा असे सूतोवाचक दिले यावेळी पंकज बोराडे,कपिल आकात यांनी पण उपस्थित पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. यावेळी मंठा युवक तालुका अध्यक्ष बाळासाहेब घारे, परतूर तालुका अध्यक्ष ओंकार काटे,परतूर शहर अध्यक्ष राजेश तेलगड,पंजाबराव अवचार,योगेश बरकुले,कदिर कुरेशी,रजाक कुरेशी, शेख अफरोज, अनवर पठाण,गजानन अँभुरे,बंटी चव्हाण,सचिन चव्हाण,बाळासाहेब चव्हाण, महेश नागरे,सत्तार कुरेशी,योगेश अवचार, सोनाजी गाडेकर, माऊली डाव्हरे, भागवत चव्हाण, अमर सोळंके,दीपक सवणे आदी उपस्थित होते.

