अंबड तालुका
खत बियानांवरील दरवाढ मागे घ्या! शिवसेनेची मागणी
शिवसेनच्या शिष्टमंडळाची मागणी.
अंबड/प्रतिनिधी
केंद्र सरकारने केलेल्या खत व बियानाच्या दरवाढी विरोधात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केंद्र सरकारच्या विरोधात तहसील कार्यालया मार्फत निषेध नोंदवत दर वाढ कमी करण्याबाबत निवेदन दिले.
कोरोनाच्या काळात आधीच शेतकरी वर्ग ग्रासलेला असताने केंद्रातील भाजप सरकारने केलेली ही दरवाढ म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस असून ह्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो अशी भावना निवेनाद्वारे केंद्र सरकार ला कळवण्यात आली.
यावेळी तहसील कार्यालयात शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबासाहेब इंगळे, विनायक चोथे, शहरप्रमुख कुमार रूपवते, दिनेश काकडे, विजयकुमार सोमाणी,युवासेना तालुकाप्रमुख रामसेठ लांडे,रमेश वराडे,गजानन सानप,सतीष धुपे, बाबु लांडे, ओमकार कुलकर्णी आदी उपस्थितीत निवेदन देत निषेध नोंदवण्यात आला.