तलावात बुडून रजाळा येथिल शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
भोकरदन : प्रतिनिधी
भोकरदन तालुक्यातील रजाळा
येथे तलावात बैल गाडी सह बुडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी २:३० वाजेच्या सुमारास घडली आहे.राजू पांडुरंग साळवे वय 47 असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
शेतामध्ये जनावरांसाठी पाणी पाजण्यासाठी गावाजवळील तलावा कडे बैल गाडी सह एक गाय घेवून जात असताना अचानक बैल जोडीने बैल गाडी तलावात ओढल्यामुळे तलावात तुडूंब भरलेल्या तलावात शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाला आहे. त्या मध्ये एक गायीचाही मृत्यू झाला असून आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी हि माहिती मिळताच त्यांनी शेतकरी राजु साळवे यांना तलाव मधून तात्काळ बाहेर काढून बैलांचा कासरा तोडून बाहेर काढल्यामुळे बैल जोडी जीव वाचला आहे.
त्यानंतर तात्काळ राजू साळवे यांना तात्काळ भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डाॅक्टरांनी मृत घोषीत करुन स्वविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. त्यांच्या पच्यात पत्नी, आई,वडील,एक भाऊ,दोन बहिणी,चार
मुल, एक मुलगी असा मोठा परिवार आहे.
राजू साळवे यांचा स्वभाव मनमिळावू होता कोणाच्या ही सुखं दुःख त नेहमी सहभागी असायचे त्यामुळे भोकरदन तालुक्या सह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.