युवा वारियर्सच्या माध्यमातून युवकांना बिजेपीशी जोडणार – अविनाश राठोड
दिपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्क
माजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर व भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्राचे महामंत्री राहुलभैया लोणीकर यांच्या मार्गदर्शन आणि आदेशावरून पक्ष्याचे विचार, शासनाच्या विविध योजना तळागाळातील सामान्य नागरिकांना,गोर गरीबांना, दुर्बल घटक व शेतकरांच्या पर्यंत पोहचल्या गेल्या पाहिजे त्यासाठी आपण तालुक्यातील युवकांना भाजपा पक्षाशी जोडणार असल्याचे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अविनाश राठोड यांनी प्रसार मध्यमाशी बोलतांना सांगितले.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढ दिवसा निमित्त “”सेवा समपन अभियान” अखंड भारतामध्ये चालू आहे अभियानाच्या माध्यमातून रक्तदान, स्वच्छता अभियान, सेवक्रत्याचे सत्कार, कोरोनाचा प्रदुभाव रोखण्याची उपाय योजना अभियान आपण तालुक्यात राबविणार असल्याचे सांगितले.
युवा ही देशाची शक्ती आहे.या शक्तीच्या माध्यमातून देश विकासा करिता आपण मंठा तालुक्यात 100 शाखा स्थापन करणार असल्याचे राठोड यांनी सांगितले. आंगामी काळामध्ये पक्षाने दिलेल्या आदेशांनी पालन करून पक्ष बळकटीसाठी जोमाने काम करणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.