जालना जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान ग्रसतांना मदत मिळवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार : राजाभाऊ देशमुख
![](https://newsjalna.com/wp-content/uploads/2021/10/IMG-20211003-WA0023.jpg)
मधुकर सहाने : भोकरदन
आज जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी भोकरदन तालुक्यातील बाभुळगाव आणि दानापुर परिसरातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनाशी संवाद साधुन त्यांच्या भावना जानुन घेतल्या.
जालना जिल्ह्यातील सर्व अतिवृष्टीमुळे बाधीत शेतकऱ्यांना व अपत्तीग्रसतांना महाविकास आघाडीचे महाराष्ट्रचे मा मुख्यमंत्री उदव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार,जालना जिल्हाचे पालक मंत्री राजेश भैय्या टोपे,आ कैलास गौरंट्याल, आ राजेश राठोड यांच्या मार्फत मदत मिळवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे राजाभाऊ देशमुख म्हणाले
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, गटनेते संतोष अन्नदाते, विशाल गाडे,दादाराव देशमुख, जहीर शेख,सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष सोपान सपकाळ यांच्यासह बाबुळगाव व दानापुर परिसरातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि गावकरी व शेतकरी यांची उपस्थिती होती.