परतूर तालुका

आझादी अमृत मोत्सव निमित्त नांदेड विभागाच्या रेल्वे सुरक्षा बल पोलिसच्या वतीने नांदेड ते औरंगाबाद बुलेट रॅलीचे परतूर येथे आगमन


दिपक हिवाळे / परतूर न्युज नेटवर्क

images (60)
images (60)


रविवार ता.३ रोजी रेल्वे सुरक्षा बल यांच्या बुलेट रॅलीचे आगमन परतूर रेल्वे स्टेशन येथे झाले. या रॅलीचे परतूर रेल्वे सुरक्षा बलचे उबाळे व परतूर रेल्वे स्टेशनचे कर्मचारी यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.
आझादीच्या अमृत मोहत्सव निमित्त पूर्ण भारत भर रेल्वेच्या वतीने प्रत्येक विभागातून रेल्वे सुरक्षा बलच्या वतीने बुलेट रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्ताने नांदेड विभागाच्या वतीने नादेड येथून बुलेट रॅलीची सुरुवात ता.१ पासून सुरुवात करण्यात आली असून नांदेडहुन पूर्णा ,परभणी ,सेलू, परतूर,जालना,मुंकूदवाडी या मार्गे औरंगाबाद येथे ता.४ रोजी सांगता होणार आहे.
या रॅलीचे उद्देश म्हणजे भारताच्या स्वांतत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाले हे सर्व सामान्या पर्यंत पोहचावे असे रेल्वे सुरक्षा बलचे उबाळे यांनी सांगितले. या रॅलीमध्ये एस. आय. श्यामकुमार , रामेश्वर (हेडकॉन्स्टेबल), आर जी नाथ भजन एस एम कारेवाडी, अविनाश पाटील, सुरेश, हनुमान मीना, शैलेश प्रकाश ,मुकुंल कुमार, चव्हाण विनायक, अंबादास मंगल, एम आर पाटील, एस एम वाघमारे, संतोष या सह एकूण ३ एस आय एच. सी.६ सी. टी.७ असे एकूण १६ अधिकारी यांची या अमृत महोत्सवला उपस्थिती होती. या रॅलीचे मार्गदर्शक म्हणून डीवायएसपी मिर्झा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!