महाराष्ट्र न्यूज

शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले जाणार नाहीत = नानाभाऊ पटोले

कापलेले विज कनेक्शन त्वरित जोडणीला सुरुवात… संबंधित विभागाला प्राप्त झाल्या सूचना

images (60)
images (60)

मुंबई = जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक दृष्ट्या संकटात असताना महावितरण कडून शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचे वीज कनेक्शन थकीत वीज बिलाचे कारण देत तोडण्याची मोहीम राबवली जात होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी याला विरोध करून महावितरणचे कार्यकारी संचालक सिंगल यांची चांगलीच कानउघाडणी देखील केली होती. गेले अनेक दिवस शेतकरी विविध संकटांचा सामना करीत आहे त्यातच आता पावसाने दडी मारलेली आहे म्हणजे एकीकडे नैसर्गिक संकट तर दुसरीकडे कोरोनाचे संकट अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडलेला असताना त्याची परिस्थिती लक्षात न घेता वीज कनेक्शन तोडणे हे चुकीचे आहे, शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे टाकलेले आहेत, काही लोकांनी रोवणी देखील केली आहेत मात्र पाण्याअभावी पऱ्हे करपायला लागले होते तर रोवणी देखील वाळायला लागली होती. अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन बिलाचे कारण देत कापू नयेत अशी आग्रही मागणी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी केली होती. त्यानुसार आता वीज कनेक्शन तोडण्यात येऊ नयेत त्यासंबंधीच्या तोंडी सूचना शासन स्तरावरुन संबंधित विभागाला आजच प्राप्त झाल्या आणि विज जोडणीला त्वरित सुरुवात झाली आहे. शेतकरी हा या देशाचा अन्नदाता आहे आणि तो संकटात असताना त्याच्यावर या पद्धतीची कारवाई होऊ नये अशी आग्रही भूमिका नानाभाऊ पटोले यांनी मांडली आणि म्हणून यावर आता निर्णय झाला आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!