मंठा तालुका

बावळट सरकार कधीपण तिसरी घाट आणेल – हभप पुरुषोत्तम महाराज पाटील

तळणी : पहिलेच तर दोन वर्ष झालेत घरीच आहोत. आता नेमकेच कुठे सुरु झालेतर हे बावळट सरकार कधीपण तिसरी घाट आणेल पण, येणार नाही . मला हेच कळत नाही की राजकीय लोकांचा कोरोना सासरा आहे की जावई ? असे प्रतिपादन हभप पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी केले.

images (60)
images (60)

मंठा तालुक्यातील तळणी येथे शनिवार दुपारी गणेशोत्सव निमित्त एकदिवसीय किर्तन सेवेचे आयोजन आराध्या कंन्ट्रक्शनचे शरद दहातोंडे पाटील व श्रीकृपा कंन्ट्रक्शनचे भगवान देशमुख यांनी केले होते. या कीर्तन कार्यक्रमात ते बोलत होते.

किर्तनात पुढे बोलताना पुरुषोत्तम महाराज पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात सर्वाधिक दारुविक्री फक्त गणेशोत्सव मिरवणूकीत व छत्रपत्री शिवाजी महाराज जयंतीच्या काळात होते. म्हणून आम्हाला कुठे नेऊन ठेवलाय आमचा धर्म असे म्हणण्याची वेळ वारकऱ्यांवर आली आहे. जीवनातील व्यसने , अवगुन व दोष कमी करणे म्हणजेच गणरायाची एका अर्थाने स्थापना करणे होय , आजच्या तरुणांनी व्यसनमुक्त जीवन जगावे, शेतक-यांच्या मुलांनी नवनवीन व्यवसायिक शिक्षण घेऊन शेतीबरोबर जोडधंदे करावे , तरुणांनी देशप्रेम, राष्ट्रप्रेम व धर्मप्रेम जपले पाहीजे , आईवडीलची सेवा करा. ईश्वर तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही, असे ह.भ.प पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी सांगितले. यावेळी तळणी पंचक्रोशीतील महिलांसह भाविकांची मोठी उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!