तिर्थक्षेत्र जांबसमर्थला बससेवेअभावी ग्रामस्थांचे हाल अनेक बसगाड्या बंद;
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मस्थळ असलेल्या जांबसमर्थ गावात गेल्या अनेक दिवसांपासून एकही बस येत नाही.त्यामुळे भाविक, व ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे.याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होताना दिसत आहे.
गेल्या वीस वर्षापूर्वी सुरु असलेली औरंगाबाद आगाराची औरंगाबाद-जांबसमर्थ ही बससेवा मागील अनेक दिवसांपासून बंद आहे.तसेच जालना आगाराची जालना आगाराची जालना-जांबसमर्थ हि बस बंद झाली आहे.अंबड आगाराची अंबड जांबसमर्थ, औरंगाबाद ही बस मागील अनेक दिवसांपासून बंद आहे.तर परतुर आगाराची परतुर -सज्जनगड हि बससेवा तत्कालीन युती सरकारच्या काळात सुरु करण्यात आली होती.तीही बंद करण्यात आली आहे.दोन तीर्थक्षेत्र जोडण्यासाठी पैठण आगाराची पैठण -जांबसमर्थ हि बससेवा सुद्धा बंद झाली आहे.त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.या बससेवा सुरू कराव्यात अशी मागणी होत आहे.जांबसमर्थ हे रामदास स्वामी यांचा जन्मस्थळ असलेला गाव आहे.या गावाची लोकसंख्या ४ हजारापेक्षा अधिक आहे. ५०० लोकवस्तीचे गाव आहे.अंबड पाथरी राज्य मार्गावरून अंबड आगाराची अंबड ते परभणी,व अंबड ते नांदेड, तर परतूर आगाराची परतुर-गेवराई,व परतुर-कुंभार पिंपळगाव या बससेवा सुरू आहेत.माञ या बसेस गावात येत नाहीत.जांबसमर्थ येथील बससेवा पुर्ववत सुरु करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहे.
” जांबसमर्थ हे रामदास स्वामी यांचे जन्मगाव असलेले गाव आहे.या ठिकाणी राज्यातील कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात. बस सेवा सुरू करण्यासाठी पुरेपुर प्रयत्न करू.”
भागवत तांगडे
ग्रामस्थ