घनसावंगी तालुका

तिर्थक्षेत्र जांबसमर्थला बससेवेअभावी ग्रामस्थांचे हाल अनेक बसगाड्या बंद;


images (60)
images (60)

कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार

घनसावंगी तालुक्यातील समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मस्थळ असलेल्या जांबसमर्थ गावात गेल्या अनेक दिवसांपासून एकही बस येत नाही.त्यामुळे भाविक, व ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे.याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होताना दिसत आहे.
गेल्या वीस वर्षापूर्वी सुरु असलेली औरंगाबाद आगाराची औरंगाबाद-जांबसमर्थ ही बससेवा मागील अनेक दिवसांपासून बंद आहे.तसेच जालना आगाराची जालना आगाराची जालना-जांबसमर्थ हि बस बंद झाली आहे.अंबड आगाराची अंबड जांबसमर्थ, औरंगाबाद ही बस मागील अनेक दिवसांपासून बंद आहे.तर परतुर आगाराची परतुर -सज्जनगड हि बससेवा तत्कालीन युती सरकारच्या काळात सुरु करण्यात आली होती.तीही बंद करण्यात आली आहे.दोन तीर्थक्षेत्र जोडण्यासाठी पैठण आगाराची पैठण -जांबसमर्थ हि बससेवा सुद्धा बंद झाली आहे.त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.या बससेवा सुरू कराव्यात अशी मागणी होत आहे.जांबसमर्थ हे रामदास स्वामी यांचा जन्मस्थळ असलेला गाव आहे.या गावाची लोकसंख्या ४ हजारापेक्षा अधिक आहे. ५०० लोकवस्तीचे गाव आहे.अंबड पाथरी राज्य मार्गावरून अंबड आगाराची अंबड ते परभणी,व अंबड ते नांदेड, तर परतूर आगाराची परतुर-गेवराई,व परतुर-कुंभार पिंपळगाव या बससेवा सुरू आहेत.माञ या बसेस गावात येत नाहीत.जांबसमर्थ येथील बससेवा पुर्ववत सुरु करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहे.

” जांबसमर्थ हे रामदास स्वामी यांचे जन्मगाव असलेले गाव आहे.या ठिकाणी राज्यातील कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात. बस सेवा सुरू करण्यासाठी पुरेपुर प्रयत्न करू.”

भागवत तांगडे
ग्रामस्थ

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!