घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

जांबसमर्थ येथे मागील सात दिवसापासून शेतकऱ्यांचे उपोषण सुरूच; प्रशासनाकडून होतोय दुर्लक्ष

कुलदीप पवार/कुंभार पिंपळगाव

images (60)
images (60)

घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील शेतकऱ्यांनी भेंडाळा ते जांबसमर्थ या पांदण रस्त्याचा काम पूर्ण करण्याच्या मागण्यांसाठी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्वाच्या पाश्वभुर्मीवर (दि.१४) पासून येथील पांदण रस्त्यावरच सामाजिक कार्य कर्ते किशोर मुन्नेमाणीक यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आमरण उपोषणास बसले आहेत.
दरम्यान,या सात दिवस उलटून गेले तरी अद्यापही प्रशासनाने दखल घेतलेली नसून या उपोषणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे.जो पर्यंत रस्ताचे काम सुरू होत नाहीत. तो पर्यंत उपोषण माघार घेणार नसल्याचा पवित्रा सामाजिक कार्यकर्ते किशोर मुन्नेमाणीक, गणेश तांगडे, मच्छिंद्र तांगडे, बशीर सय्यद,मुसाभाई शेख,नारायण राऊत, नारायण मोगरे,अर्जुन नाटकर,भीमराव मोगरे,सुभाष राऊत, अझहर सय्यद, मुस्तफा सय्यद,सद्दाम शेख,उद्धव तांगडे,परमेश्वर वायदळ, आबासाहेब गलबे, सुरेश तांगडे,सागरबाई तांगडे, आशा वाढे,ताहेरा सय्यद, अनिता तांगडे यांनी घेतला आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!