घनसावंगी तालुकाजालना जिल्हा
युवा शेतकरी संघर्ष समितीचा बिऱ्हाड मोर्चा घनसावंगी तहसील कार्यालयावर धडकणार

प्रतिनिधी/कुंभार पिंपळगाव
घनसावंगी तालुक्यातील परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात आतोनात नुकसान झाले आहे.परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीकडे वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाने अद्याप कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी (दि.१८) रोजी तहसील कार्यालय घनसावंगी येथे बिऱ्हाड मोर्चा काढण्यात येणार आहे.दरम्यान,युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आज रविवार (१६) रोजी शहरात बैठक घेण्यात आली.या बैठकीत संदर्भित मोर्चाविषयी नियोजन तसेच चर्चा करण्यात आली.बिऱ्हाडासहित मंगळवार दि.१८ रोजी सकाळी दहा वाजता तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच मोर्चात शेतकऱ्यांनी सहभागी होण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.यावेळी संघर्ष समितीचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.