अपघाती मृत्यू नंतर महाराष्ट्र ग्रामीण बँक कुंभार पिंपळगाव शाखेने दिला चार लाख विम्याचा फायदा

प्रधानमंत्री सुरक्षा व जीवन ज्योती योजनेचा धनादेश मयताच्या नातेवाईकास वितरित
जालना:
घनसावंगी तालुक्यातील गुंज येथील रामदास दशरथ घुंगासे यांचा अपघात मृत्यू झाला होता. त्याचा महाराष्ट्र ग्रामीण बँकेत प्रधानमंत्री जीवन विमा व जीवन ज्योती योजना अंतर्गत विमा संरक्षण होते . याबाबत मृताचे वारस जयश्री रामदास घूंगासे यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना यांच्या अंतर्गत प्रत्येकी दोन लाख असे एकूण चार लाख रुपयांचे धनादेश शाखा व्यवस्थापक योगेश गुप्ता यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक योगेश गुप्ता यांनी मोलाचे सहकार्य करून सदर्भित लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिल्याने त्यांचे आभार यावेळी ग्रामस्थांनी मानले
मयताच्या मृत्यू नंतर वारसा कडून आवश्यक खास कागदपत्रे जमा करून विमा कंपनीत दाखल करून कमीत कमी वेळेत विमा रक्कम वारसदारांना वितरित करण्यात आली . विमा योजनेत खातेदाराने शाखेत फॉर्म भरून स्वतःचा विमा काढून घेतला होता. संदर्भित विमा सर्व खातेदारांनी काढून घ्यावा असे आवाहन यावेळी शाखा व्यवस्थापक गुप्ता यांनी केले.
अपघाती वीस रुपयांचा विमात दोन लाखांचे संरक्षण :
हा विमा वय 18 ते पन्नास वर्ष खातेदारास काढता येतो. तसेच प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना या अंतर्गत अपघात विमा समावेश असतो व त्याचा वार्षिक रुपये 20 एवढा असतो. हा विमा वय वर्ष 18 ते 70 वर्षापर्यंतच्या खातेदारास लागू होतो. यात कुठल्याही अपघातात मृत्यू झाल्यास दोन लाखाचे संरक्षण दिले जाते.त्याचप्रमाणे
प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना ज्याचा वार्षिक प्रीमियम रुपये 436 रुपये असून विमा संरक्षण दोन लाख रुपये आहे.हा विमा वय 18 ते पन्नास वर्ष खातेदारास काढता येतो. यात अपघात झालेल्या खर्च व मयत झाल्यास याचा लाभ दिला जातो.
सदरील कार्यक्रमास शाखा व्यवस्थापक योगेश गुप्ता ,सहाय्यक व्यवस्थापक रोहित काकडे ,सहाय्यक व्यवस्थापक , विजय इंगळे बँकेचे बी सी सुरज देशमुख व कर्मचारी अशोक नव्हेरकर यांची उपस्थिती होती.