औरंगाबादमराठावाडा

यशवंत विद्यालयाच्या प्रांगणात २० वर्षानंतर भेटले वर्गमित्रमाजी विद्यार्थ्यांनी कडू-गोड आठवणींच्या शिदोऱ्या उघडल्या

images (60)
images (60)

टाकळी जिवरग/भाऊसाहेब साळवे (प्रतिनिधी )

फुलंब्री तालुक्यातील बोरगांव अर्ज येथील यशवंत विद्यालय या शाळेतील २००४ वर्षीच्या दहावीचे माजी विद्यार्थी तब्बल २० वर्षांनी एकत्रित भेटले. यावेळी या वर्गमित्रांनी शालेय जीवनातील कडू-गोड आठवणींच्या शिदोऱ्या उघडल्या.
सध्याच्या धकाधकीच्या जिवनात मागे वळून बघायला कुणाला वेळ नाही. परंतु गेट टुगेदर या निमीत्ताने २००४ वर्षी दहावीत शिकणारे वर्गमित्र – मैत्रिणी एकत्र आले. या स्नेहमेळाव्याचे निमंत्रण सर्व मित्र, मैत्रिणींना फोन, सामाजिक माध्यंमाद्वारे देण्यात आले होते. त्यामुळे यशवंत विद्यालयाच्या प्रांगणात माजी विद्यार्थ्यांच्या या स्नेहमेळाव्यात एकमेकांना भेटण्याची प्रत्येकाला उत्सुकता होती. शालेय जीवनातील आपले मित्र इतक्या वर्षांनी भेटणार म्हटल्यावर प्रत्येक जण काय करत असेल कसा दिसत असेल याचाच विचार प्रत्येकाच्या मनात सुरू होता आणि अखेर तो दिवस आला. रविवार २३ मार्च रोजी यशवंत विद्यालयाचा प्रांगणात सर्वांचीच आतुरता एका क्षणापुरती स्तब्ध झाली. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक यासारख्या सोशल मीडियामुळे अनेकांचा संपर्क एकमेकांशी येत होता. मात्र ऑनलाइन असलेली ही मैत्री काही बहरून येत नव्हती. त्यासाठी सर्वांनीच निश्चय केला आणि गेट टुगेदर करण्याचा संकल्प प्रत्यक्षात उतरला. या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात विद्यार्थी मित्र-मैत्रिणीसह आणि शिक्षकही सहभागी झाले होते. यामुळे या मेळाव्याची रंगत वाढली होती. शालेय जीवनात प्रत्येक शिक्षकाकडून होणारे ज्ञानार्जन आणि शिक्षा या आठवणींबरोबरच अनेकांनी शाळेतील आठवणींना उजाळा दिला.
सर्व विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यासाठी भाऊसाहेब साळवे व कावेरी बिरारे यांनी प्रयत्न केले होते. त्यासाठी त्यांचा सन्मान केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक गणपत गांवडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश कळम, अनिल वाणी, देवानंद व्यवहारे, शंकर मालोदे, कानबा घोगडे, राजुसिंग ठाकुर, संजय पाखरे, किरण वाघ, प्रकाश काथार, हरीचंद्र शिंदे, आरुण साळवे, काकासाहेब सुस्ते, दादासाहेब काळे यांच्यासह अनेक शिक्षक या प्रसंगी उपस्थित होते. संतोष साबळे व सिमा हिवराळे यांनी सूत्रसंचालन केले, विनायक डकले , यांनी आभार मानले.


शिक्षकांचा केला सत्कार !

याप्रसंगी सर्व शिक्षकांचा सन्मान चिन्ह व शॉल देऊन सत्कार केला. यावेळी विद्यार्थीनी व विद्यार्थी यांनी मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा दिला. या महाविद्यालयाने उत्तम विद्यार्थी व नागरिक घडविण्याचे काम केले, याचा सार्थ अभिमान असल्याचे प्राचार्य साहेबराव अपार यांनी नमूद केले.


सर्व माजी विद्यार्थ्यांचा मेळाव्यसाठी परीश्रम घेतले !

या स्नेहमेळाव्याला राजेंद्र बलांडे, दिंगाबर बलांडे, विष्णु तायडे, आर्जुन वाढेकर , पाराजी वहाटुळे, नामदेव भानुसे, दत्ता सुस्ते, प्रभाकर साबळे, राजेंद्र व्यवहारे, गजानन बिरारे, सुनिल व्यवहारे, पाडुरंग फुके, रामभाऊ फुके , दिंगाबर साठे, विट्ठल वाढेकर, अजीनाथ खरात, किशोर डकले ,न्यानेश्वर् बलांडे मंगल साबळे, कविता जिवरग, सिंधू जिवरग, रत्ना वाढेकर, पुष्पा मेटे,लता जाधव आदींनी परिश्रम घेतला

वर्ग मित्रांकडून स्नेहभोजनाची सोय !

गणेश काळे हा वर्ग मित्र छत्रपती संभाजी नगर येथे हॉटेल कॅट्रीग व्यवसाय चालतो .तब्बल विस वर्षानंतर सर्व वर्ग मित्र भेटणार असल्याने त्याने स्नेहभोजनाची उत्तम सोय केली होती .

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!