महावितरण कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनास माजी मंत्री राजेश टोपे यांनी दिली भेट

महावितरण कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनास भेट
जालना : महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी,अभियंते,अधिकारी
कृती समितीच्या वतीने महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी आज पासून तीन दिवसांचे आंदोलन पुकारले आहे. जालना येथील आंदोलन स्थळी भेट देऊन त्यांच्या मागण्या व समस्या माजी मंत्री राजेश टोपे यांनी जाणून घेतल्या.याप्रसंगी डॉ.राजेंद्र पवार संचालक (मानव संसाधन),महावितरण,मुंबई. यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला.
महावितरण कंपनीच्या नफ्याच्या क्षेत्रामध्ये अदानी,टोरेंटो इत्यादी खाजगी भांडवलदाराने वीज वितरणाचे मागितलेले परवाने देण्यास विरोध करणे,महावितरण कंपनीत पुनर्रचना,कामगार कपात करणे, 329 विद्युत उपकेंद्रे खाजगी ठेकेदारांना चालविण्यास देणे,महानिर्मिती कंपनीचे 4 जलविद्युत केंद्राचे खाजगीकरण करणे,महापारेषण कंपनी 200 कोटींचे प्रकल्प खाजगी कंपन्यांना देणे,पारेषण कंपनीस शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग करणे,वीज कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करणे,लाईन स्टॉप व इतर कर्मचाऱ्यांचे कामाचे आठ तास निश्चित करणे,रिक्त पदे मागासवर्गीयाच्या आरक्षणासह भरणे,कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा धोरणात्मक निर्णय घेणे, पगारवाढ करारानंतर प्रलंबित असलेल्या तिन्ही वीज कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या इतर प्रलंबित समस्या सोडवणे संदर्भात महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी,अभियंते,अधिकाऱ्यांच्या सघटना कृती समिती, निर्मिती, पारेषण व वितरण विज कंपन्या मधील 85000 कामगार संपावर गेलेले आहेत. सरकारने लवकरात लवकर या आंदोलनाची दखल घ्यावी व मागण्या मान्य करून कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा.



