घनसावंगी तालुका

घनसावंगीतील अतिरिक्त ऊस जयभवानी आणि येडेश्वरी उचलणार अ‍ॅड.विलासबापू खरात यांची शिवाजीराव पंडीत, अमरसिंह पंडीत व बजरंग सोनवणे यांच्याशी चर्चा

घनसावंगी दि.26(प्रतिनिधी) घनसावंगी विधानसभा मतदार संघातील सर्व शेतकर्‍यांचा अतिरिक्त ऊस बीड जिल्ह्यातील जय भवानी सहकारी साखर कारखाना आणि येडेश्वरी शुगर हे दोन्ही कारखाने उचलणार असल्याची माहिती भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अ‍ॅड. विलासबापू खरात यांनी दिली आहे. शेतकर्‍यांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या अतिरिक्त ऊसाच्या प्रश्नावर नुकतीच माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते श्री. शिवाजीरावदादा पंडीत, आ. श्री. अमरसिंह पंडीत, भाजपाचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. विलासबापू खरात आणि राष्ट्रवादीचे बीड जिल्हाध्यक्ष तथा येडेश्वरी शुगरचे चेअरमन श्री. बजरंग सोनवणे यांच्या व्यापक स्वरुपात बैठक झाली.

images (60)
images (60)

पाण्याची उपलब्धता असल्यामुळे घनसावंगी विधानसभा मतदार संघातील शेतकर्‍यांनी यावर्षी ऊसाचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले आहे. सध्याही एकट्या तिर्थपूरी विभागातील सात गटातील एकुण 28 गावांमध्ये तीन लाख 40 हजार टन ऊस उभा असून तो तीन हजार 400 हेक्टर क्षेत्रावर शेतकर्‍यांनी जोपासलेला आहे. त्यामुळे संपूर्ण घनसावंगी तालुक्यात किमान दहा ते अकरा लाख टन अतिरिक्त ऊस उभा असून हा ऊस गाळप होणे शेतकर्‍यांसाठी अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे अ‍ॅड. विलासबापू खरात यांनी वरील ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करुन हा अतिरिक्त ऊस उचलण्याची विनंती केल्यानंतर जय भवानी सहकारी साखर कारखाना व येडेश्वरी शुगर मील हे दोन्ही कारखाने आपल्या जास्तीत जास्त टोळ्या घनसावंगीत पाठवून ऊस तोडणारी यंत्रणा कामाला लावणार असल्याची माहिती अ‍ॅड. खरात यांनी दिली आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!