नुकसान झालेल्या पिकांचे पंचानामा करण्याची गटनेते अनिरूद्ध शिंदे यांची मागणी
कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झालेल्या आहे.झालेल्या नुकसानीचे पंचनामा करण्याची मागणी शिवसेनेचे गटनेते अनिरुद्ध शिंदे यांनी घनसावंगी चे तहसिलदार व तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे कि, घनसावंगी तालुक्यातील सर्वच मंडळात या वर्षी अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे फळबागांचे ज्या मध्ये मोसंबी,केळी, सिताफळ,पपई, डाळिंबाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे असे असताना आज रोजी फक्त तिर्थपुरी व अंतरवाली टेंभी या दोनच मंडळात फळबागाच्या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश देण्यात आलेले आहेत तालुक्यातील बाकी मंडळात जर पंचनामेच झाले नाही तर शासनाची मदत कशी मिळणार असा प्रश्न आहे त्यामुळे घनसावंगी तालुक्यातील सर्वच मंडळात फळबागाच्या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.