जालना जिल्हा

जालना जिल्ह्यात आजपासून ही कलम लागू

images (60)
images (60)

जालना प्रतिनिधी दि. 1

दि.6 डिसेंबर 2021 रोजी बाबरी मस्जिद पाडण्यात आली. त्याचे निषेधार्थ मुस्लिम समाजातर्फे दरवर्षी 6 डिसेंबर हा दिवस काळा दिवस व हिंदु समाजातर्फे विजय दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. तसेच दलित,बौध्द समाजाकडुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिन म्हणुन पाळला जातो. भुतकाळात घडलेल्या या घटनेच्या अनुषंगाने जातीय तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे जालना जिल्ह्यात विविध पक्ष, संघटनेच्या वतीने इतर मागण्या संदर्भात विविध राजकीय पक्ष संघटनेच्या वतीने मागण्या संदर्भात धरणे, उपोषण, रास्तारोको इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम अचानकपणे घेण्यात येण्याची शक्यता नाकरता येत नाही.

अपर जिल्हादंडाधिकारी जालना केशव नेटके यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) अन्वये अधिकाराचा वापर करुन खालील निर्देश लागु केले आहे की, पाच किंवा अधिक व्यक्तींना जमण्यास किंवा सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास मनाई आहे.
हा आदेश शासकीय कर्तव्य पार पाडणा-या कर्मचा-यांना तसेच विवाह, अंत्ययात्रा आणि पोलीस अधिक्षक जालना व उपविभागातील पोलीस अधिकारी जालना, अंबड, परतुर, भोकरदन यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुका, सभा मोर्चा यांना लागु होणार नाही. या व्यतिरिक्त इतर कोणीतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा त्या आसपास, शस्त्रे, लाठ्या, सोटे, बंदुके, तलवारी, भाले,चाकु व इतर शरीरास इजा अथवा अपाय करणा-या वस्तु जवळ बाळगणार नाहीत. तीक्ष्ण पदार्थ अथवा स्फोटके, सहज हाताळता येतील अशी घातक वस्तु जवळ बाळगणार नाहीत. दगड किंवा इतर उपकरणे प्रवर्तक शस्त्रे गोळा करुन ठेवणार नाहीत किंवा जवळ बाळगणार नाहीत. व्यक्तीच्या किंवा समुहाच्या भावना जाणुनबुजुन दुखविण्याच्या उद्देशाने असभ्यतेने भाषण म्हणणार नाही, वाद्य वाजविणार नाही गाणे म्हणणार नाही. व्यक्तीच्या किंवा शवाचे किंवा त्याच्या प्रतीकृतीचे प्रदर्शन करणार नाही. आवेषी भाषण, अंगविक्षेप विडंबनापर नकला करणार नाही आणि सभ्यता नितिमत्ता यास बाधा येईल किंवा त्यामुळे राज्यातील सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजक माजेल अशी चित्रे, निशाणी, घोषणापत्रे किंवा कोणतीही वस्तु बाळगणार नाही.

हा आदेश संपुर्ण जिल्ह्यासाठी दि. 1 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 6.00 वाजेपासून 15 डिसेंबर 2021 रोजीच्या सायंकाळी 600 वाजेपर्यंत अंमलात राहील.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!